बांगलादेश : साखर कारखान्यांना प्रचंड तोटा

ढाका : स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टेड सरकारी कंपनी शामपूर शुगर मिलद्वारे केवळ वार्षिक Tk२०६ कोटी रुपयांत साखर विक्रीमुळे Tk ६०६ कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. दरवर्षी साखर विक्रीतून कंपनीला तीन पट अथवा त्यापासून अधिक नुकसान होत आहे.

शेअर बाजारातील सरकारी मालकीची आणखी एक नोंदणीकृत साखर कारखाना झील बांगलादेश साखर कारखान्याचीही स्थिती अशीच आहे. नव्याने प्रकाशित झालेल्या वार्षिक अहवालानुसार कंपनीने Tk ३६ कोटी रुपयांची साखर विक्री केली आहे. तर कारखान्याला Tk ५६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शामपूर साखर कारखान्यातही अशाच पद्धतीने साखर विक्रीतून तोटा वाढत आहे. शेअर बाजारात नोंदणीकृत या दोन्ही कंपन्याच नव्हेत तर एक डझनभर सरकारी कारखाने अशाच पद्धतीने दरवर्षी तोट्यात सुरू आहेत. अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार यामुळे कंपन्या तोट्यात असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारने आणखी दीर्घ काल तोटा सहन करण्याऐवजी हे कारखाने खासगी क्षेत्राला दिले पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

आकडेवारी पाहिली असता आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये शामपूर साखर कारखान्याची विक्री Tk२०६ कोटी ७९ लाख ९० हजार रुपये आहे. याऊलट आर्थिक वर्षात कंपनीला तोटा Tk७०८ कोटी ९२ लाख १० हजार रुपये झाला. आधीच्या वर्षी २०१८-१९ मध्ये कंपनीच्या Tk१३१ कोटी ५२ लाख ६० हजारच्या विक्रीच्या तुलनेत Tk९३१ कोटी ४४ लाख १० हजार रुपये तोटा झाला होता. आर्थिक वर्ष २०१६-१८ मध्ये साखर विक्री Tk१४३ कोटी ७ लाख ८० हजार रुपयेहोती. तर कंपनीला Tk४७९ कोटी ९ लाख ४० हजार रुपये तोटा झाला होता.

अशाच प्रकारे जिल्हा बांगला साखर कारखान्याने २०१९-२० मध्ये ३६ कोटी ६ लाख २६ हजार रुपयांची साखर विक्री केली. या वर्षी कंपनीला ५६ कोटी २१ लाख २९ हजार रुपयांचा तोटा झाला. गेल्या आर्थिक वर्षात २०१८-१९ मध्ये कंपनीला ७२.३४ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. त्यावेळी एकूण विक्री २६.७४ कोटी रुपये होती. या नोंदणीकृत कंपन्या वगळता पंचगड साखर कारखाना, ठाकुरगाव साखर कारखाना, सेताबगंज साखर कारखाना, राजशाही साखर कारखाना, उत्तर बंगाल साखर कारखाना, नटोर साखर कारखाना, पबना साखर कारखाना, कुश्तिया साखर कारखाना, मुबारकगंज साखर कारखाना आणि फरीदपुर साखर कारखानाही तोट्यात सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here