बांगलादेश : आयात शुल्कातील कपातीनंतरही देशांतर्गत बाजारात साखरेची दरवाढ

ढाका : बांगलादेश सरकारने साखरेच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अलीकडेच आयातीवरील सीमाशुल्क काही प्रमाणात कमी केले. परंतु त्यानंतरही किरकोळ बाजारात दरवाढ सुरूच राहिल्याने सरकारचे हे पाऊल व्यर्थ ठरले आहे. सीमा शुल्कात प्रती किलो केवळ ५० पैसे (टका) कपात अत्यल्प असल्याचे आयातदारांचे म्हणणे आहे. आयातदारांच्या मते, अद्यापही आम्हाला ४२ रुपये (टीके) द्यावे लागत आहेत. उद्योग मंत्रालयाने २२ फेब्रुवारी रोजी बांगलादेश शुगर अँड फूड इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनने उत्पादित केलेल्या तपकिरी साखरेच्या किमतीत प्रती किलो २० रुपये (टका) वाढ करण्याची घोषणा केल्यानंतर काही तासांतच त्यांनी आपला निर्णय रद्द केला. पण दरम्यानच्या काळात दरवाढीच्या निर्णयामुळे साखरेचे दर किलोमागे चार ते पाच टका (बांगलादेशी चलन) वाढले, मात्र नंतर ते मागे घेण्यात आले.

व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या आठवडाभरात देशातील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या चट्टोग्राममधील खातुनगंज येथे प्रति मण (३७.३२2 किलो) साखरेच्या दरात १२०-१४० टका वाढ झाली आहे. काल सरासरी साखरेचे दर प्रती मण ५,०००-५,०२० टका होते, जे आठवड्यापूर्वी ४,८८०-४,९०० टका होते. या वाढीमुळे, किरकोळ स्तरावर दर प्रती किलो ५ टका वाढले. गेल्या आठवड्यात चट्टोग्राम शहरात साखरेचे दर १४०-१४५ रुपयांनी वाढले होते. यापूर्वी ८ फेब्रुवारी रोजी सरकारने साखर आयातीवरील निश्चित सीमा शुल्क १,५०० टकापासून १,००० टका प्रती टन कमी केले होते. आयातदारांचे म्हणणे आहे की, सरकारने लावलेल्या अतिरिक्त शुल्कामुळे स्थानिक बाजारात आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत जवळपास दुप्पट दराने साखर विकावी लागत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here