थकबाकी प्रलंबित राहिल्यास कारवाईसाठी तयार रहा: डीएम

बिजनौर: डीएम रमाकांत पांड्ये यांनी ऊस थकबाकी न भागविणाऱ्या साखर कारखान्यांना फटकारले. डीएम यांच्याकडून निर्धारीत एक आठवड्याच्या आत जवळपास 80 करोड थकबाकी च्या पैकी कारखान्यांनी केवळ 30 करोड रुपयेच भागवले आहेत.

डीएम यांनी कॅम्प कार्यालयात झालेल्या बैठक़ीत सांगितले की, कारखाना अधिकार्‍यांचे अशाप्रकारचे वागणे सहन केले जाणार नाही. एक तर अधिक़ार्‍यांनी थकबाकी भागवावी अन्यथा कारवाईला सामोरे जावे. डीएम यांनी बिलाई, बिजनौर,चांदूपर आणि बरकातपूर साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना फटकारताना सांगितले की, कारखान्याच्या अधिकार्‍यांनी आपण थकबाकी टाळू शकतो असा विचारही करु नये. प्रशासन शेतकर्‍यांना वेळेवर पैसे देण्यासाठी कटीबद्ध आहे. डीएम यांनी जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांना थकबाकी न करणार्‍या कारखान्यांविरोधात नोटीस काढण्याचे आदेश दिले. डीएम म्हणाले, साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांनी साखर विकून किंवा ग्रुपच्या इतर कोणत्याही संसाधनाने ऊस थकबाकी भागवावी. ते म्हणाले, पुढच्या आठवड्यात जर साखर कारखान्यांनी थकबाकी भागवली नाही तर त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली जातील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here