साखर कारखान्यावर धरणे आंदोलन

सरसावा: सहकारी साखर कारखान्यामध्ये शेतकर्‍यांचा उस रिजेक्ट करण्याबाबत उस अधिकारी तसेच शेतकर्‍यांमध्ये बाचाबाची झाली. उस अधिकार्‍याच्या व्यवहारामुळे नाराज शेतकर्‍यांनी गेटवर ऊसाचे वजन करणे बंद करुन कारखाना परिसरामध्ये धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी पोचलेल्या मुख्य लेखाकारांनी शेतकर्‍यांना समजावून वजन सुरु केले.

शेतकरी प्रमोद राणा यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखाना सरसावा चे मुख्य ऊस अधिकारी शेतकर्‍यांनी कष्टाने पिकवलेले उसाचे पीक सातत्याने रिजेक्ट करत आहेत. मंगळवारीही त्यांनी हुसैनपूर चे शेतकरी इरशाद चौधरी यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरलेला ऊस खराब झाल्याचे सांगून रिजेक्ट केला आहे. तसेच 2 ते 5 क्विंटल पर्यंत कपात करण्याबाबतही सांगितले. याबाबत माहिती मिळाल्यावर शेतकरी संतापले. तपासणीमध्ये शेतकर्‍यांचा ऊस चांगला आढळून आला, तरीही सीसीओ यांनी शेतकर्‍यांची कडक वर्तणूक केली. संतापलेल्या शेतकर्‍यांनी सहकारी साखर कारखान्याच्या केन यार्डमध्ये बुग्गी तसेच ट्रॉली बंंद करुन धरणे आंदोलनास सुरुवात केली. प्रधान व्यवस्थापक वीपी पांडे यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्य लेखाकार सौरभ बंसल शेतकर्‍यांजवळ पोचले तसेच त्यांच्या समस्या ऐकून घेवून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. जवळपास एक तासानंतर शेतकरी ऊस वजन करण्यासाठी तयार झाले. शेतकर्‍यांनी स्पष्ट केले की, जर मुख्य उस अधिकार्‍यांच्या व्यवहारामध्ये सुधारणा झाली नाही तर त्यांना नाइलाजाने आंदोलन करावे लागेल. यावेळी इरशाद, बिल्लू चौधरी, राशिद, रुबी चौधरी, मुकेश सैनी, संजय, साजिद, तालिब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here