ऊस थकबाकी भागवण्याच्या मुद्द्यावरुन भाकियू चे धरणे प्रदर्शन

बस्ती, उत्तर प्रदेश: भारतीय किसान यूनियन ने ऊस थकबाकी भागवणे, जंगली जनावरांपासून पीकाच्या सुरक्षेसह 11 सूत्रीय मागण्यांसाठी बुधवारी विकास भवन गेट वर धरणे आंदोलन केले. संध्याकाळी एसडीएम सदर आशाराम वर्मा, डीसीओ रंजीत कुमार निराला, कारखान्याचें प्रतिनिधी आणि भाकियू नेत्यांमध्ये चर्चा तसेच 31 ऑक्टोबर पर्यंत मुंडेरवा व बभनान कारखान्या कडून ऊस थकबाकी शंभर टक्के भागवली जाईल, या अश्‍वासनावर धरणे आंदोलन मागे घेण्यात आले.

भाकियू चे मंडल अध्यक्ष सुभाष चंद्र या शेतकर्‍याने सांगितले की, भाजपा सरकार ने सांगितले की, शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करु, पण ऊस शेतकर्‍यांचे करोडो रुपये साखर कारखान्यांवर देय आहेत, यावर सरकार गप्प आहे. मंडल उपाध्यक्ष दीवान चंद पटेल यांनी सांगितले की, जर शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर नोव्हेंबरमध्ये शेतकरी कृषी यंत्रांसह आपला हक्क मागण्यासाठी मंडल मुख्यालयात येतील. यावेळी एसडीएम सदर, डीसीओ भाकियू नेत्यांची समजूत घालत होते. संध्याकाळी अधिकार्‍यांसह भाकियू चे जिल्हाध्यक्ष जयराम चौधऱी, डॉ.आर.पी. चौधरी, मातेंद्र सिंह, त्रिवेणी चौधऱी, रामचंद्र सिंह, राजेंद्र चौधरी, राम मनोहर चौधऱी, शोभाराम ठाकुर आदींनी चर्चा केली. दरम्यान भाकियू नेत्यांनी सांगितले की, तांदळाच्या पीकावर हल्दीया रोग पडत आहे, यामध्ये शेतकर्‍यांचा दोष नाही. जर शेतकर्‍यांचा हल्दिया रोगग्रस्त तांदूळ खरेदी केला नाही तर शेतकरी तांदळाला जिल्हाधिकारी कार्यालयावर घेवून जातील. यानंतर एसडीएम यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये साखर कारखान्यांवर ऊस थकबाकी व्याजासहित भागवली जावी, मुंडरेवा कारखान्याकडून ऊसाच्या चांगल्या प्रजातिच्या नावावर देण्यात आलेले बियाणे 018 आदीमुळे खूप नुकसान झाले आहे, सर्वे करुन त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी, जंगली जनावरांपासून पीकांची सुरक्षा करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here