शेतकरी नेत्यांनी ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घातला घेराव

अमरोहा(उत्तरप्रदेश): जिल्हयामध्ये ऊस पावती वितरणातील मनमानी कारभाराविरोधात संतप्त शेतकरी नेत्यांनी ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच तब्बल चार तास घेराव घातला. ऊस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतरच शेतकरी नेत्यांनी घेराव मागे घेतला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास 17 मार्च पासून पुन्हा घेराव घालण्याचा इशारा दिला.

भारतीय किसान यूनियन भानू चे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिवाकर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी नेते शुक्रवारी दुपारी १ वाजता जिल्हा ऊस अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात पोचले. त्यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. काही वेळानंतर जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली, पण शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. कसेबसे ते बोलायला तयार झाले. शेतकरी नेत्यांच्या म्हणण्यानुसार तीन क्रय केंद्र नरैनी, नरैना खुर्द आणि काफूरपुर च्या साखर कारखान्यात बदल करायचा आहे, पण ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह बदल करण्यास तयार नाहीत. यावेळी अध्यक्ष भगत सिंह, बॉबी चौधरी, छतर सिंह, जसवीर सिंह, नरेंद्र सिंह, बृजपाल सिंह, सतवीर सिंह, डॉ. हरपाल सिंह, समरपाल सैनी, पप्पू सिंह, संतरपाल सिंह, यशवीर सिंह, ओमवीर सिंह, राम सिंह, अमरपाल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here