इकबालपूर साखर कारखान्याला मोठा धक्का

रुडकी : इकबालपूर साखर कारखान्याची परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. कारखाना अर्थिक अडचणींशी झुंज देत आहे, यामुळे ऊस उत्पादकांची थकबाकी देखील देय आहे. या साखर कारखान्याला एक मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे कारखान्याची हालत अधिक खराब होणार आहे. इथल्या सर्वच ऊस उत्पादकांनी कारखान्याला ऊस पुरवठा करणार नसल्याची घोषणा केली आहे. यामुळे कारखाना गाळप हंगाम सुरु करु शकणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

इकबालपूर साखर कारखाना क्षेत्रातल्या ऊस उत्पादकांना त्यांचे पैसे न मिळाल्याने ते संतापले आहेत. कारखान्याची साखर लिलावातही विकली जात नाही, इतकी कारखान्याची हालत खराब आहे. इकबालपूर कारखान्यावर ऊस उत्पादकांचे 258 करोड रुपये देय आहेत. कारखान्याकडून दोन वर्षापासून शेतकर्‍यांची ही थकबाकी दिलेली नाही. थकबाकीसाठी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलनेही केली, पण तरीही त्यांचे पैसे देण्यात साखर प्रशासन असफल राहिले आहे. अखेर, थकबाकी देण्यासाठी शेतकर्‍यांनी कारखान्याची साखर विकण्याचा निर्णय घेतला होता, पण सततच्या अडचणींमुळे साखर विकता आली नाही.

3 सप्टेंबरला साखरेचा लिलाव करुन शेतकर्‍यांची देणी कारखाना भागवणार होता, पण व्यापार्‍यांनी लिलावातील अटी पाहून साखर विकत घ्यायला नकार दिला, ज्यामुळे शेतकर्‍यांची देणी पुन्हा लांबली. आज शेतकर्‍यांचे प्रतिनिधी मंडळ डीएम ना भेटून थकबाकी तात्काळ मिळण्यासंदर्भात मागणी करणार आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here