पटना : लॉकडाउन दरम्यान ऊस शेतकर्यांना आर्थिक सहकार्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी बुधवारी राज्यातील 11 खासगी साखर कारखानादारांनी शेतकर्यांचे 934.34 करोड रुपये ताबडतोब भागवण्याचे आदेश दिले आहेत. मोदी यांनी सांगितले की, लॉकडाउन मुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. अशा वेळी, जर त्यांना ऊसाचे पैसे वेळेवर मिळाले तर त्यांना दिलासा मिळेल.
उपमुख्यमंत्री यांनी सांगितले की, हरिनगर आणि नरकटियागंज (पी. चंपारण), सिधवलिया (गोपलगंज) आणि हसनपूर (समस्तीपूर) या साखर कारखान्यांकडून जवळपास 67 टक्के थकबाकी भगावण्यात आली आहेत. मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशातील प्रतापपूर साखर कारखान्याकडून बिहार च्या शेतकर्यांचे 11.38 करोड रुपये देय आहेत.
ते म्हणाले, साखर कारखान्यांनी गेल्या गाळप हंगामात, राज्यातील सर्व खासगी साखर कारखान्यांनी 2036.23 करोड रुपयांच्या 675 लाख क्विंटल ऊसाचे गाळप केले. पण, आता केवळ 1101.88 करोड रुपये भागवले आहेत आणि 934.34 करोड रुपये देय आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.