बिजनौर साखर कारखान्याकडून महाराष्ट्राला ५२ हजार क्विंटल कच्ची साखर रवाना

बिजनौर साखर कारखान्याने शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देण्याची तयारी केली आहे. वेव्ह ग्रुपच्या बिजनौर साखर कारखान्याकडून ५२ हजार क्विंटल कच्ची साखर महाराष्ट्रातील रेणुका शुगर मिलला पाठवली जात आहे. यातील एक रॅक पाठवण्यात आली आहे. तर दुसरी २६ हजार क्विंटल कच्च्या साखरेची रॅक तयार करण्यात येत आहे.

बिजनौर साखर कारखान्याने सध्याच्या गळीत हंगामात शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे दिलेले नाहीत. शेतकऱ्यांना आता पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. बिजनौर साखर कारखाने रेणुका शुगर मिलला ५२ हजार क्विंटल कच्ची साखर देत आहे. २६ हजार क्विंटली एक रॅक पाठविण्यात आली आहे. दुसरी भरण्यात येत आहे. ती रात्री उशीरापर्यंत जाईल. कारखान्याकडून साखर निर्यात झाल्यानंतर मिळणारे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येतील. बिजनौरहून पाठवलेली कच्ची साखर रेणुका शुगर मिलमध्ये रिफाईन केली जाईल. त्यानंतर ती परदेशात पाठवली जाणार आहे. या कच्च्या साखरेला ३४६०रुपये दर मिळणार आहे. २६ हजार क्विंटल कच्ची साखर महाराष्ट्रात पाठवली गेली आहे. दुसरी रॅकही पाठवली जात आहे. यासाठी ३४६० रुपये दर मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकर पैसे मिळतील असे बिजनौर साखर कारखान्याचे प्रशासन अधिकरी ए. के. सिंह यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here