आमदार दलवीर सिंह म्हणाले, साखर कारखान्याची क्षमता वाढवली जावी

अलीगढ,उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या अलीगढ जिल्ह्यामध्ये भाजपचे बरौली विधान सभा क्षेत्राचे आमदार ठा. दलवीर सिंह यांनी बुधवारी लोक भवनामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सोबत समस्यांबाबत भेट घेतली. आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, जवां, बरौली, गभाना ग्राम पंजायतींना नगर पंचायत बनवण्याचा प्रस्ताव शासनाला मिळाला आहे आणि त्याची अंतरिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे. क्षेत्रीय जनतेची मागणी आहे की, अतिशीघ्र नगर पंचायत घोषित केली जावी. गभाना ला पूर्वमध्ये ब्लॉक सृजित करण्यात आले आहे. याचे लवकर संचालन होणे आवश्यक आहे.

आमदारांनी ऊस शेतकर्‍यांच्या समस्याही मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या. सांगितले की, जिल्ह्यामध्ये कधी ऊस उत्पादन खूप अग्रणी होते. पण साखर कारखान्याचे मशीन सतत खराब झाल्याने ऊसाचे गाळप वेळेत न झाल्याने ऊस शेतकरी अडचणींमध्ये आहेत. मशीन्स देखील खूप जुने झाले आहेत. नव्या अधिक क्षमतेची मशीन्स लावण्याची आवश्यकता आहे, ज्यामुळे ऊस शेतकर्‍यांची मोठी सोय होईल. गाव बिसरा मध्ये शहीद झालेल्या सैनिकाच्या सम्मानामध्ये बिसारा ते बामौती शहीद मार्गाचे निर्माण केले जाण्याचा प्रस्तावही मुख्यमंत्र्यां समक्ष ठेवला आहे. आमदारांनी तांदळाच्या शेतकर्‍यांच्याही समस्या ठेवल्या. मुख्यमंत्र्यांनी सर्व मागणीवर सकारात्मक आश्‍वासन दिले आणि जनोपयोगी कार्य लवकर करण्याचे आश्‍वासन दिले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here