ऊसाला प्रति क्विंटल 450 रुपये दर घोषित करण्याची भाकियूची मागणी

अफजलगढ, उत्तर प्रदेश:भाकियू च्या मासिक बैठकीमध्ये ऊस दर वाढवण्यासह विविध मुद्यांवर विचार करुन शेतकर्‍यांच्या समस्येचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली. बुधवारी लोनिवी यांच्या बंगल्यावर आयोजित बैठकीमध्ये पुढच्या हंगामासाठी ऊसाचा दर 450 रुपये प्रति क्विंटल करावा, कारखाना 15 ऑक्टोबरपासून सुरु करावा, अशी मागणी करण्यात आली. वाढलेले विज दर तसेच करार शेती अध्यादेश परत घेणे, सततच्या ट्रिपिंक समस्येचे निराकरण करुन थांबलेल्या घरगुती विज लाईन पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. त्यांनी सांगितले की, घरगुती विज ग्राहकांचे मीटर 2019 मध्ये बसवण्यात आले, पण बिल वर्ष 2018 पासूनच वसुल केली जात आहेत. बैठकीमध्ये विज ग्राहकांकडून घेतलेले अधिक पैसे पुन्हा परत करणे, जनावरांकडून पीकांचे नुकसान थांबवणे, निराधार पशुंना गोशाळेत पाठवण्याच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी दर्शन सिंह फौजी, राणा सिंह, मुख्तियार सिंह, सुखदेव सिंह, लियाकत अली, रणजीत सिंह, भूपेंद्र सिंह, विजेंद्र सिंह, गुरुदेव सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here