भाकियू ने डीएम यांना सांगितल्या शेतकऱ्यांच्या समस्या

सहारनपूर : भारतीय किसान यूनियन च्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत जागरूक केले. यूनियनने जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून देय असणारे शेतकऱ्यांचे पैसे, साधन सहकारी समित्यांकडून यूरिया, खत उपलब्ध करावे, गहू खरेदीचे पैसे लवकर भागवण्याची मागणी केली आहे.

भारतीय किसान यूनियन च्या प्रतिनिधिमंडळाने गुरुवारी कलक्ट्रेट पोचले आणि जिल्हाधिकारी अखिलेश सिंह यांची भेट घेतली. यूनियन चे प्रदेश उपाध्यक्ष विनय कुमार यांनी डीएम यांना शेतकऱ्यांच्या समस्या सांगितल्या. ते म्हणाले, जनपद येथील शेतकऱ्यांना रेल्वे आणि रस्त्याच्या करण्यात आलेल्या भूमी अधिग्रहण मध्ये मार्ग अवरूध्द झाले आहेत, त्यांना लवकर दिलासा मिळावा. जिल्हााधिकाऱ्यांनीधिकाऱ्यांनी समस्या ऐकल्या आणि त्या लवकरच सोडवण्याबाबत आश्वासन दिले. त्यांनी बैठकीमध्ये एआर कोआपरेटिव ला निर्देशित केले की त्यांनी सहकारी साधी समितीमध्ये यूरिया खत लवरच उपलब्ध करावे. ज्या क्षेत्रात यूरिया खत उपलब्ध नाही तिथे ते लवकर उपलब्ध केले जावे. त्यांनी एआर कोआपरेटिव, डिप्टी आरएमओ, बजाज आणि बैंकेच्या अधिकाऱ्यांांबरोबर उद्या सकाळी 11:00 वाजता कलेक्ट्रेट सभागृहात भारतीय किसान यूनियन च्या सदस्यांसह बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शासन स्तरााावरून येणाऱ्या सूचनाही पाळल्या जाव्यात असे सांगितले. हे देखील सांगण्यात आले की, जर कोणती विभागीय समस्या असेल तर सांगावी. डीएम यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, शेतकऱ्यांच्या गहू खरेदीचे पैसे भागवण्याच्या प्रक्रियेमध्ये वेग आणला जाईल. यूनियनच्या सर्व सदस्यांनी सांगितले की, कोरोनामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस तसेच गहू ची तोडणी तसेच विक्रीमध्ये कोणतीही अडचण आली नाही. यासाठी सदस्यांनी काऱ्यांचे आभार मानले.

यावेळी जिल्हा अर्थ तसेच संख्या अधिकारी अमित कुमार, भाकियू जिल्हाध्यक्ष चौधरी चरण सिंह, चौधरी अशोक कुमार, प्रदीप शर्मा, मेवाराम, मुकेश तोमर, संजय, सनिल, प्रदीप कुमार राणा, तेल्लू राम, सुरेश, जयपाल, मनोज आदि उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here