साखर धंद्याचा पाय दिवसेंदिवस खोलातच चालला आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर कोसळत आहेत, साखर निर्यात जवळजवळ थांबली आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरगोदामे ओसंडून वाहात आहेत. या हंगामाची धुराडी विझतात तोच नव्या ऊसतोडीची तयारी सुरू झाली आहे. त्याला सामोरे जाताना यंदा प्रथमच साखर धंद्यात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कारखान्यांवरील ‘एफआरपी’चे ओझे वाढले असून ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची कशी, असा मुख्य प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. साखरेचा दर आणि शिल्लक साखरेचा मेळच लागत नसल्याने कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. कारखान्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. थकीत कर्जांचा बोजाही यामुळे वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या हंगामावर होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि त्यांच्या संघटना हे वास्तव कळत असल्याने अजून तरी शांत आहेत. मात्र सरकारने आता वेळ दवडून चालणार नाही. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय, राज्य साखर संघांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी झालेली बैठक सकारात्मकच म्हणावी लागेल. बहुसंख्य कारखानदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे असल्याने साखर कारखानदारीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. मात्र निवडणुका तोंडावर आल्याने हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांना शिष्टमंडळाने भेटण्याचा निर्णय झाला. कारखान्यांकडून विक्री केल्या जाणाऱ्या साखरेस क्विंटलला ३२०० रुपये देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. यावर पंतप्रधानच काय तो निर्णय घेऊ शकतात. याशिवाय इथेनॉलला दरवाढ, त्यावरील जीएसटीची कपात, साखर निर्यातीला अनुदान, या काही प्रमुख मागण्याही आहेत. सरकारने आतातरी राजकारणाची झूल उतरवून साखर धंद्याला बूस्ट द्यावा. प्रश्न कारखानदारांचा तर आहेच, त्याहून अधिक तो सामान्य आणि अडचणीतील शेतकऱ्यांचा आहे!
Recent Posts
Unseasonal rains have dampened consumer demand, but rural growth provides positive outlook for FMCG...
New Delhi: The Indian FMCG sector is facing mixed conditions, with unseasonal rains posing a challenge to the sales of summer-centric products, while rural...
इथेनॉल खरेदीच्या किमतींमध्ये सुधारणा करण्याची सरकारकडे मागणी : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
मुंबई : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, २०२३-२४ मध्ये ३१५.४० लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्यात ५८ लाख टनांची घट होऊन,...
ખાંડની MSP વધારવા માટે કેન્દ્રીય મંત્રી અમિત શાહને મળશે: નાયબ મુખ્યમંત્રી અજિત પવાર
પુણે: નાયબ મુખ્યમંત્રી અજિત પવારે કહ્યું કે શેરડીના FRP ભાવમાં ઘણી વખત વધારો થયો છે, જ્યારે ખાંડની MSP માત્ર એક જ વાર વધી છે....
बिहार में कभी 1200-1500 रुपये में बिकने वाले मक्के की कीमत में अब एथेनॉल...
पटना : केंद्रीय कृषि एवं किसान कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान ने ‘विकसित कृषि संकल्प अभियान’ के तहत अभियान के पांचवें दिन बिहार के...
SPAR Austria cuts more than 4,500 tonnes of sugar in own brands
Now, with shifting consumer preferences, companies are increasingly focused on reducing sugar content in their products. SPAR Austria is also actively contributing to this...
Sensex ends 636 points lower, Nifty below 24,550
Indian benchmark indices ended lower on third consecutive session on June 3.
Sensex ended 636.24 points lower at 80,737.51, whereas Nifty concluded 174.10 points down...
चीनी MSP बढ़ाने के लिए केंद्रीय मंत्री अमित शाह से मिलेंगे: उपमुख्यमंत्री अजीत पवार
पुणे: उपमुख्यमंत्री अजीत पवार ने कहा की, गन्ने का FRP मूल्य कई बार बढ़ा है जबकि, चीनी का MSP सिर्फ एक बार बढ़ा है।...