साखर धंद्याचा पाय दिवसेंदिवस खोलातच चालला आहे. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे दर कोसळत आहेत, साखर निर्यात जवळजवळ थांबली आहे. अतिरिक्त उत्पादनामुळे साखरगोदामे ओसंडून वाहात आहेत. या हंगामाची धुराडी विझतात तोच नव्या ऊसतोडीची तयारी सुरू झाली आहे. त्याला सामोरे जाताना यंदा प्रथमच साखर धंद्यात कमालीची अस्वस्थता दिसून येत आहे. कारखान्यांवरील ‘एफआरपी’चे ओझे वाढले असून ही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची कशी, असा मुख्य प्रश्न कारखानदारांना भेडसावत आहे. साखरेचा दर आणि शिल्लक साखरेचा मेळच लागत नसल्याने कारखाने ‘शॉर्ट मार्जिन’मध्ये गेले आहेत. कारखान्यांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. थकीत कर्जांचा बोजाही यामुळे वाढणार आहे. याचा थेट परिणाम येत्या हंगामावर होणार हे निश्चित आहे. शेतकरी आणि त्यांच्या संघटना हे वास्तव कळत असल्याने अजून तरी शांत आहेत. मात्र सरकारने आता वेळ दवडून चालणार नाही. यासंदर्भात मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यांच्यासह ज्येष्ठ मंत्री आणि राष्ट्रीय, राज्य साखर संघांच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत सोमवारी झालेली बैठक सकारात्मकच म्हणावी लागेल. बहुसंख्य कारखानदार राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे असल्याने साखर कारखानदारीकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. मात्र निवडणुका तोंडावर आल्याने हालचाली सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पंतप्रधानांना शिष्टमंडळाने भेटण्याचा निर्णय झाला. कारखान्यांकडून विक्री केल्या जाणाऱ्या साखरेस क्विंटलला ३२०० रुपये देण्याची मागणी कारखानदारांनी केली आहे. यावर पंतप्रधानच काय तो निर्णय घेऊ शकतात. याशिवाय इथेनॉलला दरवाढ, त्यावरील जीएसटीची कपात, साखर निर्यातीला अनुदान, या काही प्रमुख मागण्याही आहेत. सरकारने आतातरी राजकारणाची झूल उतरवून साखर धंद्याला बूस्ट द्यावा. प्रश्न कारखानदारांचा तर आहेच, त्याहून अधिक तो सामान्य आणि अडचणीतील शेतकऱ्यांचा आहे!
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 15/11/2025
ChiniMandi, Mumbai: 15th Nov 2025
Domestic Market
Domestic sugar prices were stable to weak
Domestic sugar prices remained stable to weak across major markets, with demand continuing...
तेलंगाना : आदिलाबाद में मक्का की खेती का रकबा बढ़ा
आदिलाबाद: इस खरीफ सीजन में जिले में मक्का की खेती का रकबा बढ़ा है। पिछले साल सोयाबीन उगाने वाले किसानों को कीटों के हमले...
आंध्र प्रदेश के लॉजिस्टिक्स इको-सिस्टम को डिजिटल बनाने के लिए समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर...
नेशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर डेवलपमेंट कॉरपोरेशन (एनआईसीडीसी), लॉजिस्टिक्स डेटा सर्विसेज लिमिटेड (एनएलडीएसएल) और आंध्र प्रदेश सरकार ने 14 नवंबर 2025 को विशाखापत्तनम में आयोजित 30वें...
पंतप्रधान 19 नोव्हेंबर 2025 रोजी पीएम-किसान योजनेचा 21वा हप्ता जारी करणार
पीएम किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजना ही केंद्र सरकारची योजना असून ती 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे पात्र शेतकरी कुटुंबाला...
भारत की थोक मुद्रास्फीति अपने निम्नतम स्तर पर पहुँच गई, 2025-26 तक बनी रह...
नई दिल्ली: यूनियन बैंक ऑफ इंडिया ने एक रिपोर्ट में कहा है कि, भारत का थोक मूल्य सूचकांक (WPI) या थोक मुद्रास्फीति "निम्नतम स्तर...
सातारा : ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांनी संघटीत होण्याचे रयत क्रांती शेतकरी संघटनेचे आवाहन
सातारा : ‘यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कारखानदार ऊसदराबाबत बोलायला तयार नाहीत. त्यासाठी आपणाला आंदोलन करावे लागेल. कष्टाचा दाम घ्यावाच...
उत्तर प्रदेश : गैरप्रकार टाळण्यासाठी ऊस खरेदी केद्रांवर प्रशासनाचे लक्ष
हरदोई : जिल्ह्यात चार साखर कारखाने कार्यरत आहेत. त्यांचा ऊस गाळप हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. बघौली, रुपापूर, लोणी आणि हरियाणवा येथे हे साखर...
फिलीपींस : टाइफून टिनो से विसाय के चीनी उद्योग को 1.2 बिलियन पेसो का...
मनिला : चीनी नियामक प्रशासन (एसआरए) के प्रारंभिक आकलन के अनुसार, टाइफून टिनो ने विसाय के चीनी उद्योग को 1.2 बिलियन पेसो से अधिक...
कर्नाटक : KRRS ने ट्रैक्टर जलाने की निंदा की; घटना के लिए सरकार के...
बागलकोट : कर्नाटक राज्य रैयत संघ (KRRS) ने बागलकोट जिले के समीरवाड़ी स्थित एक चीनी मिल के सामने ट्रैक्टर जलाने की हालिया घटना की...
उत्तर प्रदेश : मुळे, पाने किंवा माती असलेला ऊस कोणत्याही खरेदी केंद्रावर न स्वीकारण्याचा...
मुरादाबाद : राज्यातील कोणत्याही खरेदी केद्रावर शेतकऱ्यांकडून ऊस विभागाला फक्त स्वच्छ आणि हिरवा ऊस पुरवला जाईल. शेतकऱ्यांकडून मुळे, पाने किंवा माती असलेला ऊस कोणत्याही...














