मंसूरपूर कारखान्यात 15 पर्यंत गाळप सुरु राहू शकते

मुजफ्फरनगर : जिल्ह्यातील खतौली साखर कारखाना आणि सहकारी साखर कारखाना मोरना यांनी आपल्या गाळप हंगामाचा समारोप केला आहे. आता जिल्ह्यामध्ये केवळ मंसूरपूर साखर कारखान्यात गाळप सुरु आहे. मंसूरपूर कारखान्याचे गाळप 15 जून पर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये ऊसाचे विक्रमी उत्पादन झालयामुळे यावेळी साखर कारखाने उशिरापर्यंत सुरु होती. खतौली साखर कारखान्यामध्ये गुरुवारी गाळप हंगाम संपला. साखर कारखान्याने आपल्या क्षेत्रातील सर्व ऊस गाळप झाल्याचा दावा केला आहे. यापूर्वी सहकारी साखर कारखाना मोरना बंद झाला आहे. जिल्ह्यात आता केवळ एकमात्र मंसूरपूर साखर कारखान्यात गाळप सुरु आहे. यामध्ये 15 जून पर्यंत गाळप सुरु राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये उशिरापर्यंत साखर कारखाने सुरु आहेत. सर्वात पहिला भैसाना, खाईखेडी आणि टिकौला कारखाना बंद झाला. यानंतर रोहाना ने गाळप संपवले. तितावी कारखाना जून च्या पहिल्या आठवड्यात बंद झाला. डीसीओ डॉ आर डी द्वीवेदी यांनी सांगितले की, प्रत्येक शेतकर्‍याचा ऊस साखर खरेदी केला आहे, जो उरलेला ऊस आहे त्याचे गाळप मंसूरपूर साखऱ कारखाना करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here