फिजी: यावर्षी ऊस गाळप अधिक चांगले होण्याची शक्यता

सुवा : देशामध्ये या आठवड्यापासून सुरु होणार्‍या गाळप हंगामासाठी ऊस शेतकर्‍यांनी कंबर कसली आहे. नाडी येथील शेतकरी बलराम म्हणाले, त्यांच्या दोन शेताची कापणी करण्यात आली, कारण त्यांना एका चांगल्या गाळप हंगामाची आपेक्षा आहे. ते म्हणाले, ज्याप्रमाणे गाळप हंगामाचा जो काही बोलबाला सुरु आहे, त्यानुसार यंदाचा गाळप हंगाम चांगला जाईल. गाळप हंगाम कोणत्याही व्यत्ययाशिवाय चालेल. आता पाउसही नाही आणि मशीन्स देखील चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जर अशी स्थिती राहिली तर कदाचित या आठवड्यात मी माझ्या 1,000 टन ऊसाची कापणी संपवू शकतो. आपल्या आयुष्याचा अधिकांश वेळ साखर उद्योगामध्ये राहिलेल्या राम यांचे म्हणणे आहे की, यावर्षी त्यांचे योगदान अधिक आहे, कारण अर्थव्यवस्था कोरोना वायरस ने पिडित झाली आहे.

फौजन्स हार्वेस्टिंग ओनर हसरत बेग म्हणाले, हार्वेस्टर मशीन कसे चालवायचे ते मी शिकत आहे. ते म्हणाले, स्थानिक मजूर असतील तर फायद्याचे आहे. कारण जेव्हा आम्ही भारतातून आपॅरेटर्सना घेवून येतो, तेव्हा त्यांच्या राहण्याची आणि मोठ्या पगाराची सोय करावी लागते. लुटोका कारखाना बुधवारी गाळप सुरु करेल, तर रारावाई कारखाना उद्यापासूनच गाळप सुरु करेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here