थकित बिलांसाठी साखर कारखान्यासमोर धरणे

ऊन, उत्तर प्रदेश: भारतीय किसान युनीयनच्या कार्यकर्त्यांनी गट अध्यक्ष यशपालसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ऊन साखर कारखान्याच्या प्रदेशद्वारावर धरणे आंदोलन केले. यावेळी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, एमएसपीसाठी कायदा बनविण्याची मागणी केली. ऊस दर ४५० रुपये प्रति क्विंटल करण्यासह थकित बिले व्याजासह द्यावीत, शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज मोफत द्यावी, साखर कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांगले रस्ते बनवावेत आदी मागण्यांचा पुनरुच्चार करण्यात आला. मागण्या मान्य न झाल्यास २६ जानेवारीपासून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

धरणे आंदोलनावेळी घटनास्थळी आलेल्या कारखान्याचे सर व्यवस्थापक अनिल अहलावत यांनी कारखान्याकडून ३१ जानेवारीपर्यंत थकीत बिले देण्याची मागणी केली. यावेळी झिंझाना पोलीस ठाण्याचे अधिकारी श्यामवीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. धरणे आंदोलनात ब्रह्मपाल बझेडी, उग्र सिंह चौहान, महावीर सरपंच, यशपाल खेडकी, सत्यपाल, विपिन, मेदताब, मुकेश, धर्मपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here