पलवल : साखर गोदामाला लागलेल्या आग प्रकरणात सदर थाना पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल केली आहे. केसक कारखान्याच्या व्यवस्थापकांनी केलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर पोलीस ठाण्याचे एसएचओ इस्पेक्टर जितेंद्र कुमार यांनी सांगितले की, आग कशी लागली याचा तपास सुरु आहे. शुक्रवारी दुपारी लागलेल्या या आगीमुळे जवळपास १० करोडचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
साखर कारखान्याच्या एमडी ने सांगितले की, गोदामात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत साखरेची पोती जकून खाक झाली, तसेच मोठया प्रमाणात साखरे ने भरलेली पोती वाचवण्यात यश आले. आगीचे कारण आणि झालेले नुकसान तपासण्यासाठी एक समिती गठीत केली जात आहे. सध्या तरी करोड़ों रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.