नवी दिल्ली : केंद्र सरकारने ३१ मार्च २०२१ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील ५५२ साखर कारखान्यांना साखर विक्रीचा २२ लाख टन कोटा मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी गेल्या महिन्याच्याच्या तुलनेत जादा साखर कोटा मंजूर केला गेला आहे. खाद्य मंत्रालयाने मार्च २०२१ मध्ये २१ लाख टन साखर विक्रीच्या कोट्यास मंजूरी दिली होती. दुसरीकडे एप्रिल २०२०च्या तुलनेतही साखर विक्रीचा कोटा जादा मंजूर झाला आहे. गेल्यावर्षी, एप्रिल २०२० मध्ये १८ लाख टनाचा कोटा देण्यात आला होता.
बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, उन्हाळा अधिक कडक होऊ लागल्याने बाजारातील मागणी सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांच्या मतानुसार कोटा पूर्णपणे संपू शकतो. गेल्यावर्षीच्या तुलनेत जादा साखर कोटा मंजूर करण्यात आला आहे.
केंद्र सरकारने साखरेच्या वितरणातील नियोजनासाठी आणि किमती स्थिर ठेवण्यासाठी मासिक कोटा मंजूरीची प्रक्रिया लागू केली आहे.