चांदपूर, नजीबाबाद साखर कारखाने आजपासून बंद

बिजनौर : जिल्ह्यातील साखर कारखाने आतापर्यंत गाळप करीत आहेत. चांदपूर आणि नजीबाबाद कारखाने आज बंद करण्यात येतील. शेतकऱ्यांकडील उसाचे गाळप पूर्ण झाल्यानंतर आता कारखाने बंद होत असल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी दिली.

जिल्ह्यात सुमारे २ लाख ४७ हजार एकरपर्यंत होता. चांगले पिक आल्याने साखर कारखाने आतापर्यंत गाळप करीत आहेत. जिलह्यात व्हेव ग्रुपचा बिजनौर साखर कारखाना आणि बजाज ग्रुपाचा बिलाई साखर कारखाना बंद झाला आहे. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, आता चांदपूर आणि नजीबाबद साखर कारखाने आजपासून बंद होत आहेत. शेतकऱ्यांचा सर्व ऊस गाळप झाला आहे. जिल्ह्यातील अन्य कारखाने २५ मे पर्यंत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. चांगले पिक आल्याने कारखाने आतापर्यंत गाळप करीत आहेत.

हंगाम लांबल्याने पुढील वर्षी अडचण
जिल्ह्यातील ऊस हंगाम २५ मेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. अद्याप काही कारखाने सुरू आहेत. गतीने गाळप केले जात आहेत. मात्र, सध्या ज्या शेतांमध्ये ऊस तोडणी सुरू आहे, अशा ठिकाणी पुढील वर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. कालावधी पूर्ण होत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here