मुख्यमंत्री योगी यांच्याकडून इथेनॉल प्लांटची पायाभरणी

गोंडा : राज्यातील यापूर्वीचे सरकार केवळ दंगली घडवत होते. मात्र, आताचे सरकार विकासावर भर देत आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. मुख्यमंत्री योगी यांच्या हस्ते इथेनॉल प्लांटची पायाभरणी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री योगी यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार टीका केली. बसपा आणि सपावर टीका करताना ते म्हणाले, की काकी आणि पुतण्याला विकासापासून कोणीही रोखले नव्हते. तरी त्यांच्या कार्यकाळात फक्त भ्रष्टाचार केला जात होता.

मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांचाही यावेळी उल्लेख केला. हे सरकार सर्वांना मोफत लसीकरण करीत आहे. मोफत धान्य, वीज कनेक्शन आणि गॅस सिलिंडर देत आहे. विकासाच्या वाटेवर राज्याची वाटचाल सुरू असल्याचे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here