चित्तुर साखर कारखान्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करणार: खासदार

चित्तूर :खासदार एन रेड्डाप्पा यांनी सांगितले की, शेतकरी आणि श्रमिकांचे हित लक्षात घेता चित्तूर को ऑपरेटिव साखर कारखाना पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला जाईल. कारखाना पुन्हा सुरु करण्याच्या शक्यतांना शोधून एक विस्तृत रिपोर्ट मुख्यमंत्री वाई एस जगन रेड्डी यांच्याकडें सुपुर्द केला जाईल. त्यांनी सांगितले की, दोन दशकांपूर्वी बंद झालेली चित्तूर सहकारी डेअरी देखील पुन्हा सुरु करण्याची मागणी सीएम यांच्यासमोर ठेवण्यात येईल.

रविवारी एन रेड्डाप्पा यांनी सांगितले की, टीडीपी सरकारच्या कुव्यवस्थेमुळे साखर कारखाना बंद झाला होता. त्यांनी आरोप केला की, टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू जिल्हयातील सर्व सहकारी संस्थांच्या खराब स्थितीसाठी जबाबदार आहेत.

त्यानीं सांगितले की, जगन मोहन रेड्डी शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. आणि विश्‍वास आहे की, सीएम चित्तूर शुगर आणि डेअरी दोन्हीलाही पुनरुज्जीवित करण्यासाठी आपली अनुमती देतील.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here