अंबाला : अंबालामधील नारायणगड साखर कारखान्याशी संलग्न शेतकऱ्यांनी उसाचे थकीत पैशासाठी हरियाणाच्या ऊस आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री खट्टर यांनी चंदीगडमध्ये अंबालाचे उपायुक्त विक्रम यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर हे आदेश जारी करण्यात आले. हरियाणा मुख्यमंत्री कार्यालयाने याविषयी दोन ट्विट केले आहेत.
सीएमओ हरियाणाच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेताना मुख्यमंत्री खट्टर यांनी अधिकाऱ्यांना लवकरात लवकर शेतकऱ्यांचे थकीत पैसे देण्याबाबत प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय, नारायणगड साखर कारखान्याला मुख्यमंत्र्यांनी सक्त आदेश देत गळीत हंगाम २५ नोव्हेंबर २०२१ पूर्वी सुरू करावा असे सांगितले आहे. याशिवाय, कारखान्याने शेतकऱ्यांचे थकीत पैसे द्यावेत असेही सांगण्यात आले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link