सितारगंज साखर कारखान्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

सितारगंज : गेल्या चार वर्षापासून बंद पडलेल्या सीतारगंज साखर कारखान्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. साखर कारखान्याच्या बॉयलर पूजन झाले आहे. गळीत हंगामाच्या प्रारंभासाठी कारखाना प्रशासनाला आता मुख्यमंत्र्यांच्या होकाराची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री कारखान्याच्या गळीत हंगामाच्या उद्घाटनाला येतील अशी अपेक्षा आहे.

पुष्कर सिंह धामी यांनी सीतारगंज आमदार सौरभ बहुगुणा आणि ऊस मंत्री यतीश्वरानंद यांच्यासोबत बंद पडलेल्या कारखान्याची पाहणी केली होती. सितारगंज कारखान्यामध्ये सितारगंज , नानकमत्ता आणि खटीमा येथील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणला जातो. आमदार असताना धामी यांनी सांगितले होते की, चार वर्षे कारखाना बंद पडला होता. त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येतील.

काही काळानंतर धामी स्वतः मुख्यमंत्री बनले. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी ऊस मंत्री यतीश्वरानंद, सीतारगंज आणि नानकमत्ता येथील आमदारांसोबत बैठक घेऊन कारखाना याच हंगामात सुरू करण्याचा निर्णय घेतला. याबाबत कॅबिनेटच्या बैठकीत प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम देऊन कारखाना सुरू करण्याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. ऊस विकास विभागाचे सचिव हरवंश सिंह चुघ यांनी तीन महिन्यात चार वेळा या कारखान्याला भेटी दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here