साखर कारखान्यामध्ये गाळप बंद झाल्यानंतर गोंधळ

रुद्रपूर, उत्तराखंड: तांत्रिकी बिघाडामुळे किच्छा साखर कारखान्यामध्ये गाळप सुरु झाल्याच्या दोन तासानंतर कारखाना बंद झाला. कारखाना बंद झाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकर्‍यांबरोबर साखर कारखाना परिसरात मोठा गोंधळ केला. त्यांनी आरोप केला की, साखर कारखाना व्यवस्थापन पुरेसा उस नसल्याचे कारण सांगून हात वर करण्याचा प्रयत्न करत आहे.

साखर कारखान्याचे अधिशासी निदेशक रुचि मोहन रयाल यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे आरोपांना बगल देत सांगितले की, साखर कारखाना सातत्याने गाळप करत आहे. बुधवारी रात्री उस नसल्याने कारखाना बंद करण्यात आला होता. काँग्रेस प्रदेश सचिव संजीव सिंह यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्तें आणि शेतकर्‍यांनी कारखाना व्यवस्थापना विरोधात घोषणाबाजी करुन निदर्शने केली. त्यांनी इशारा दिला आहे की, जर कारखाना व्यवस्थापनाने कारखाना सुरु केला नाही तर आंदोलन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here