साखर कारखान्याच्या कॉलनीतील विज तोडल्यामुळे गोंधळ

बाजपूर: साखर कारखान्याच्या एका वस्तीमध्ये 15 कुटुंबांची विज तोडल्यामुळे लोकांनी आक्रोश केला. या लोकांनी प्रशासनाच्या कार्यालयासमोर मोंठा गोंधळ केला. कारखान्याचे महाव्यवस्थापक प्रकाश चंद यांची भेट घेतली. दरम्यान जीएम यांनी विज कनेक्शन जोडण्याचा विश्‍वास दर्शवला.

बुधवारी सकाळी साखर कारखान्याच्या प्रशासनाकडून एका कॉलनीमध्ये राहणार्‍या 15 कुटुंबांची विज तोडण्यात आली. दुपारी लोकांनी जीएम कार्यालयात जावून मोठा गोंधळ केला आणि जीएम प्रकाश चंद यांच्याशी चर्चा केली. संध्याकाळी उशीरा कारखाना प्रशासनाकडून विज जोडण्यात आली. सभासद मुकुंद शुक्ला यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने वस्तीची विज तोडून कॉलनी रहिवाशांना त्रास दिला आहे. त्यांनी जीएम स्तरावरुन केलेल्या कारवाईवर नाराजी दाखवली. हे प्रकरण कॅबिनेट मंत्री यशपाल आर्य यांच्या समोर सादर करण्याबाबत सांगण्यात आहे आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here