शेतकऱ्यांना दिलासा: गेल्या गळीत हंगामातील शंभर टक्के थकबाकी जमा

आग्रा : न्यौली साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या गळीत हंगामातील सर्व थकबाकी कारखान्याने जमा केली. याशिवाय, चालू गळीत हंगामातील पैसे देण्याची तयारी सुरू केली आहे.

गेल्या गळीत हंगामातील ऊस बिले एक वर्षभर अडकली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांनी अनेकदा आंदोलने करून आपल्या मागण्या मांडल्या. मात्र, त्यातून तोडगा निघाला नव्हता. ऊस विभागाने न्यौली साखर कारखान्याला नोटीस बजावली होती. जिल्हाधिकारी सी. पी. सिंह यांनी कडक भूमिका घेतल्यानंतर पैसे मिळाले. सर्व पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आले आहेत.

आता या हंगामात जो ऊस खरेदी केला आहे, ती बिले देण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. नव्या सत्रातील गाळप बंद झाल्यानंतर जुन्या हंगामातील पैसे देण्यावर अधिक जोर देण्यात आला. याशिवाय आगामी हंगामासाठी लागवडीचा आढावा घेतला जात आहे. गेल्या हंगामात किती हेक्टर क्षेत्रावरील ऊस उपलब्ध झाला होता, यावर्षी किती हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे याचा आढावा घेतला जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here