महाराष्ट्रातील गळीत हंगामाला आता गती आली आहे. साखर आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, १४ नोव्हेंबर २०२१ पर्यंत राज्यात एकूण १३१ साखर कारखान्यानी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ६२ सहकारी आणि ६९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ९७.७१ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्याने आतापर्यंत ९३.६१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सर्वसाधारण साखर उतारा ८.६५ टक्के इतका आहे.
कोल्हापूर विभागात आतापर्यंत २८ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यात आला आहे. कोल्हापूर विभागाने आतापर्यंत २७.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामातील ११.४८ लाख हेक्टर ऊस क्षेत्र ११ टक्क्यांनी वाढून २०२१-२२ या हंगामात १२.७८ लाख हेक्टर जाले आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. यासोबतच राज्याच्या सर्व विभागातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. इथेनॉलसाठी जर ऊस वळवला गेला नाही तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन जवळपास १२२.५ लाख टन होऊ शकते असा अंजाद इस्माने वर्तविला आहे.