महाराष्ट्रात ४९ कारखान्यांचे गाळप संपुष्टात

पुणे : महाराष्ट्रातील गळीत हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात १६ मार्च २०२१ पर्यंत ४९ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकेवारीनुसार, १६ मार्च २०२१ पर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ९१०.४८ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. तर ९४६.२९ लाख क्विंटल साखेरेच उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३९ टक्के इतका आहे.

साखर आयुक्तालयाकडील माहितीनुसार, सोलापूर विभागात ३१ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ८ कारखान्यांनी गाळप बंद केले आहे. अहमदनगर विभागात तीन कारखाने बंद झाले असून औरंगाबाद आणि नांदेड, अमरावती विभागात प्रत्येकी २ कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. पुणे विभागात मात्र एकच साखर कारखाना बंद झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here