वादळी वारा आणि पावसाने ऊसाच्या पीकाचे नुकसान

बगोदर: विभागातील अटका लक्षीबागी येथील शेतकर्‍यांचा मुख्य व्यवसाय ऊसाची शेती आणि ऊसापासून रस काढून विकणे हा आहे, पण लॉकडाउनमुळे हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. आता शेतकरी नाइलाजाने ऊसाच्या रसापासून गुळ बनवून विकण्याचे काम करत आहेत. गुळ विकल्यानंतर शेतकर्‍यांनि पुन्हा आपापल्या शेतांमध्ये ऊस पीक लावले. तीन चार दिवसांपासून सातत्याने होत असलेला पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे शेतामध्ये लावलेल्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पावसाबराबेरच वादळी वारा यामुळे ऊसाचे पीक जमिनीवर पडले आहे आणि मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी सांगितले की, खूप मेहनत करुन शेतांमध्ये ऊस लागवड केली होती, पण संततधार पाऊस आणि वार्‍यामुळे पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी सरकारकडे नुकसान भरपाई मागितली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here