दौराला, सकौती व नंगलामल साखर कारखान्यामध्ये गाळप सुरु

मेरठ: दौराला साखर कारखान्याच्या 89 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ मंत्रोच्चारांनी झाला. कारखान्यामध्ये सर्वात पहिल्यांदा उस घेवून आलेल्या कस्बा दौराला चे शेतकरी ताहर सिंह यांच्या श्रीराम समूहाचे सीनियर एमडी एवं सीईओ आलोक बी श्रीराम यांनी हार आणि शाल देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी एमडी माधव बी, अक्षयधर रुद्र, रोहन बी आदी उपस्थित होते.

कारखाना उपाध्यक्ष संजय रस्तोगी आणि महाव्यवस्थापक संजीवन खाटियान यांनी सांगितले की, साखर कारखान्याकडून वर्ष 2019-20 चे सर्व उस मूल्य व समिती अंशदानाचे पैसे भागवण्यात आले आहेत. गाळप हंगाम 2020-21 साठी साखर कारखान्याकडून 161 क्रय केंद्र स्थापित करण्यात आले आहेत. तर, सकौती स्थित आईपीएल ग्रुप च्या साखर कारखान्याचा गाळप हंगामाचा शुभारंभ पंडित गोविंद शरण मिश्रा यांच्या हस्ते हवन करुन झाला. यजमान कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक दीपेंद्र कुमार खोखर होते. याशिवाय दौराला चे व्यापार संघ अध्यक्ष ठाकुर हरपाल सिंह चौहान, मुनेंद्र, सचिन उपाध्याय यांनी साखर कारखान्याच्या अधिकार्‍यांना दुर्घटनांवर रोख लावण्यासाठी ट्रकमध्ये ओवरलोड उस न भरण्याचे अपील केले. तिकडे, नंगलामल साखर कारखान्यामध्ये हवन पूजनानंतर उस उपायुक्त राजेश मिश्रा, डीसीओ डॉ. दुष्यंत कुमार, कारखान्याचे जीएम वाईडी मिश्रा, उस महाव्यवस्थापक एलडी शर्मा यांच्यासह शेतकर्‍यांनी कैन कॅरियरमध्ये उस घालून गाळप हंगामाचा शुभारंभ केला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here