साखर कारखान्यांना दिलेली मुदत संपण्याच्या मार्गावर, अजून पर्यंत नाही भागवली थकबाकी

लखनऊ: दिवाळी देखील आता संपेल, पण उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी अजूनही ऊसाची थकबाकी भागवलेली नाही. पैशाशिवाय उदरनिर्वाह करणे शेतकऱ्यांना कठीण असल्याने सर्व शेतकऱ्यांच्यात नाराजी आहे.

राज्याचे ऊस मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, ऊस थकबाकी न भागवलेल्या कारखान्यां विरोधात कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांनी लगेच थकबाकी भागवली आहे. सर्व थकबाकी लवकरच भागवली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

मंत्री सुरेश राणा ऊस गाळप हंगामाच्या पूर्व तयारी पााहण्यासाठी रमाला साखर कारखान्यााच्या दौऱ्यावर होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सााखर कारखान्याच्या गाळप सत्राचे उद्घाटन करतील.

डिफाल्टर साखर कारखान्यांविरोधात आदेश देताना ते म्हणाले, उत्तर प्रदेश सरकारने ऊस शेतकऱ्यांचे पैसे भागवण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत चा कालावधी निर्धारीत केला आहे. आता सर्व कारखाने उर्वरीत पैसे वेळेच्या आधी भागवतील की, शेतकऱ्यांना अजूनही पैशासाठी वाट पहावी लागेल, हे महत्वाचे आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here