उसाचे पैसे न दिल्यास आंंदोलनाचा इशारा

उसाचे पैसे न दिल्यास आंंदोलनाचा इशारा

बिजनौर : आजाद किसान युनियनच्या बैठकीमध्ये उसाचे पैसे न दिल्यामुळे शेतकर्‍यांनी नाराजी दाखवली. शेतकर्‍यांना संपूर्ण पैसे मिळावेत यासाठी मोठे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठक़ीत घेण्यात आला आहे. सिंचन विभागाच्या डाक बंगल्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र सिंह यांनी सांगितले की, साखर कारखाने शेतकर्‍यांचे पैसे देत नाही आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या नोटीस चीही कारखान्यांना भिती नाही. बिजनौर साखर कारखान्याने आजपर्यंत एक रुपयाही दिलेला नाही.

जिल्हाध्यक्ष विरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सरकार उसाचे पैसे देण्यात अपयशी आहे आणि शेतकर्‍यांना आरसी कापून त्यांचे शोषण केले जात आहे. लवकरच मोठे आंदोलन केले जाईल आणि शेतकर्‍यांच्या समस्येचे समाधान केले जाईल. या दरम्यान हाजी शकील अहमद, संजीव राठी, नरेश कुमार, हरपाल सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here