साखर कारखान्यांनी 15 टक्के व्याज द्यावे

पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी 2019-20 च्या हंगामासाठी शेतकर्‍यांना एफआरपी रकमेच्या 58.53 टक्के दिलेले आहेत, जे एकूण 1,037.13 करोड रुपये आहेत. 735.93 करोड रुपये एफआरपी अजूनही देय आहे. महाराष्ट्र साखर आयुक्तालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, एकूण 1,771.82 करोड एफआरपी देय होती.

महाराष्ट्र ऊस नियंत्रण बोर्डाच्या प्रल्हाद इंगोले यांनी राज्य सरकारचे मुख्य सचिव, सहसचिव आणि महाराष्ट्र साखर आयुक्तांकडून,अशा कारखान्यांकडून 15 टक्के व्याजाची मागणी केली आहे. जे कारखाने शेतकर्‍यांना निश्‍चित वेळेत एफआरपी भागवण्यात अपयशी राहिले आहेत. इंगोले यांनी दावा केला की, नांदेड क्षेत्रामध्ये अनेक कारखान्यांनी शेतकर्‍यांची बाकी भागवलेली नाही आणि आपल्या सोयीनुसार शेतकर्‍यांना पैसे देत आहेत. अशा कारखान्यांविरोधात तात्काळ कारवाई करुन,थकीत एफआरपी 15 टक्के व्याज लावले जाईल. परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यामध्ये एकाही कारखान्याने शेतकर्‍यांची बाकी भागवलेली नाही. याशिवाय त्यांनी केवळ कमी पैसे दिले आहेत आणि ही स्थिती शेतकर्‍यांना अर्थिक संकटात टाकत आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 113 कारखान्यांनी ऊस गाळपात भाग घेतला आहे आणि 75 कारखान्यांनी शेतकर्‍यांना पूर्ण एफआरपी भागवलेली नाही. जवळपास 38 कारखान्यांनी शेतकर्‍यांना 100 टक्के एफआरपी भागवली नाही. आणि गेल्या हंगामातील एफआरपी देखील बाकी आहे. मराठवाड्यातील कारखाने जानेवारीच्या शेवटपर्यंत बंद होण्याचा अंदाच आहे, पश्‍चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यात गाळप होवू शकेल.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here