भाकियू च्या बैठकीमध्ये थकबाकीची मागणी ऐरणीवर

हल्दौर, उत्तर प्रदेश: ब्लॉक कार्यालय ड्वाकरा मध्ये आयोजित भाकियू च्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांकडून ऊस थकबाकीची मागणी करण्यात आली. शुक्रवारी ब्लॉक कार्यालयाच्या ड्वाकरा हॉलमध्ये आयोजित भाकियू च्या बैठक़ीमध्ये संघटनेचे प्रदेश महासचिव राम अवतार सिंह यांनी सांगितले की, सरकारकडून पारित तीन कृषी कायदे शेतकर्‍यांच्या हिताचे नाहीत. संघटना कोणत्याही कीमतीवर शेतकर्‍यांचे शोषण सहन करणार नाही. त्यांनी तांदुळ खरेदी केंद्रावर तांदळाची खरेदी सुरु करणे, विजेंच्या वाढलेल्या दरांमध्ये कपात करणें, विद्युतकर्मचाऱ्यां कडून शेतकर्‍यांचे कनेक्शन न कापणे, ऊसाचा दर पाचशे रुपये प्रति क्विंटल आदी प्रमुख मागण्या केल्या आहेत. तसेच बैठक़ीमध्ये पोचलेल्या सहकारी ऊस विकास समितीचे सचिव ओमप्रकाश यांच्यासमोर शेतकर्‍यांनी बिलाई साखर कारखाना लवकर सुरु करणे आणि शेतकर्‍यांच्या ऊसाचे पैसे लवकर देण्यासह विविध समस्यांना मांडले. बैठकीमध्ये ब्लॉक अध्यक्ष उदयवीर सिंह, धमेंद्र सिंह, हुकुम सिंह, रामपाल सिंह, राजेंद्र सिंह, रामवीर सिंह, डालचंद सिंह, देवेंद्र सिंह, सतेंद्र देशवाल आदी शेतकर्‍यांनी भाग घेतला.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here