तामीळनाडूत बंद साखर कारखाना सुरू करण्याची मागणी गतीमान

तामीळनाडू ऊस उत्पादक शेतकरी संघाने मदुराई येथील अलंगनल्लूप येथील नॅशनल को-ऑपरेटिव्ह शुगर मिल्समध्ये गाळप सुरू करण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली. गेल्या दोन वर्षांपासून हा कारखाना बंद आहे.
दोनशेहून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या आंदोलनाचे सामूहिक प्रतिनिधीत्व केले. जिल्हाधिकारी एस. अनिश शेखर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नावे एक निवेदन दिले. आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शेतकऱ्यांनी याबाबतच्या निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी कारखान्यात गाळपासाठी १८५० एकर ऊस नोंदणी करण्यात आली आहे. आणि ६०,००० टन ऊस कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहे. याशिवाय १५ हजार टन ऊस शेतकऱ्यांना नोंदणी केलेला नाही. मात्र, हे शेतकरी हा ऊस गाळपासाठी पाठविण्यास तयार आहेत. वासुदेवनल्लूपमध्ये धरणी साखर कारखान्याकडील ५०,००० टन ऊसही या कारखान्याकडे डायव्हर्ट केला जाऊ शकतो, असा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here