ऊसाचा दर वाढवण्याची आणि थकबाकी भागवण्याची मागणी

देवबंद, उत्तर प्रदेश: पश्‍चिम प्रदेश मुक्ती मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष भगतसिंह वर्मा यांनी सरकारकडे ऊसाला 600 दर घोषित करावा आणि ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी, अशी मागणी केली आहे.

रविवारी नूना बडी गावात झालेल्या बैठक़ीमध्ये वर्मा बोलत होते. त्यांनी सांगितले की, कृषी संबंधी पास केलेला नवा कायदा शेतकरीविरोधी आहे. यासाठी केंद्र सरकारला हा कायदा ताबडतोब मागे घ्यावा लागेल. तसेच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जाच्या ओझ्याखाली असणार्‍या सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले जावे. सरकारने साखर कारखान्यांना 25 ऑक्टोबरपासून सुरु करावे. वर्मा यांनी सांगितले की, ऊसामुळे राज्य सरकारला सर्वात अधिक महसूल मिळतो . तरीही शेतकर्‍यांना ऊसाचे पैसे वेळेत मिळत नाहीत. सरकारने ऊसाला 600 रुपये क्विंटल दर न दिल्यास आणि ऊस थकबाकी लवकर न भागवल्यास शेतकर्‍यांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागेल. अध्यक्षस्थानी अब्बास प्रधान होते. सूत्रसंचालन अद्बुल रहमान यांनी केले. यावेळी वाजिद अली त्यागी, हाफिज ईस्माइल, रणबीर सिंह, बुद्धु हसन, तौफीक राशिद, रिफाकत,मूसा, इकबाल, भूरा, बिलाल आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here