आगामी गाळप हंगामात ऊसाच्या दरांमध्ये वाढ करण्याची मागणी

यमुनानगर,उत्तर प्रदेश :
शेतकरी नेते सतपाल कौशिक यांनी मागणी केली आहे की, गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबित ऊस शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर मिळावि यासाठी कारखान्यांनी पावले उचलणे गरजेचे आहे. त्यांनी सांगितले की, गाळप हंगाम जवळपास चार महिन्यांपूर्वी संपला आहे, पण सहकारी आणि खाजगी कारखान्यांकडून आतापर्यंत शेतकऱ्यांना 75 करोड रुपये थकबाकी मिळत नाही. ज्याचा वाईट परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. कोरोना मुळे शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत, पण राज्य सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे.

शेतकरी नेते कौशिक यांनी आगामी गाळप हंगामात ऊसाच्या किंमतीमध्ये वाढीची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, किटकनाशक आणि उर्वरकांच्या किमती गेल्या काही वर्षांमध्ये जवळपास दुप्पट झाल्या आहेत, ज्यामुळे सरकारने ऊस दरामध्ये 50 रुपये प्रति क्विंटल वृध्दीची घोषणा करावी.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here