साखर कामगारांची थकबाकी भागवण्याची मागणी

साखर उद्योगाची अर्थव्यवस्था कठीण काळातून जात आहे. ऊस देय देण्यास महाराष्ट्रातील कारखाने अग्रेसर आहेत पण कामगारांना अद्यापही मोबदला मिळालेला नाही.

महाराष्ट्रातील कामगारांच्या वेतनाची थकबाकी 500 कोटींवर गेली असून कामगार संघटनांनी पेमेंटसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला ,तसेच कामगारांचा पगार लवकरात लवकर भागवला जाण्याची मागणी केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कामगार मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले, आम्ही कामगारांच्या थकबाकी देय मागण्यासाठी मागील राज्य सरकारकडे संपर्क साधला होता, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. आता आम्ही या प्रकरणी महा विकास आघाडी सरकारकडे विचारणा करत आहोत. पुढील महिन्यात नवीन हंगाम सुरू होणार आहे. जर हा प्रश्न सुटला नाही तर कामगारांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here