थकीत ऊस बिले दिवाळीआधी देण्याची मागणी

लखीमपुर खीरी : राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने थकीत ऊस बिलाबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे सुपुर्द केले.

राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण वर्मा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तहसील कार्यालयास भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना ऊसाची थकीत बिले त्वरित दिली पाहिजेत. तरच दिवाळीचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो.

शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे देण्याबाबत साखर कारखानदारांचे धोरण योग्य नाही. देशात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना चौदा दिवसात पैसे दिले जावेत असे निर्देश दिले आहेत. जर वेळेवर पैसे दिले नाहीत, तर व्याज देण्याची तरतुद आहे. असे असताना साखर कारखानदार सरकारला जुमानत नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याविरोधात कोर्टाच्या अवमानाबाबत तक्रार नोंदवली गेली पाहिजे अशी मागणी वर्मा यांनी यावेळी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here