हरारे: टोंगाट हुलेटस झिम्बावेची मक्तेदारी मोडीतकाढण्यासाठी ऊस शेतकरी साखर उद्योगामध्ये व्यापक सुधारना घडवून आणण्यासाठी जोर देत आहेत. ऊस उत्पादक आणि मिलर यांच्यात उत्पन्न वाटप निश्चित करण्यासाठी वापरल्या गेलेल्या फॉर्म्युलाचा आढावा घेत असल्याचे शेतकरी संघटनांच्या एका गटाने सांगितले.
आठ शेतकरी संघटनांच्या एका समूहाचे प्रवक्ते फराई मुतम्बा म्हणाले की, आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे टोंगाट यांच्या बराबेर असणारे आमचे व्यावसायिक संबंध आहेत, जे बिलकुल व्यवहार्य नाहीत. महसूल सामायिकरण एक व्यवहार्य व्यवस्था नाही. आमच्याकडे एक जुना कायदा आहे, आणि या समस्यांचे तेच एक कारण आहे. उद्योग आणि वाणिज्य मत्री डॉ.सेकाई नेजेंजा यांनी सांगितले की, त्यांचे मंत्रालय ऊस शेतकरी आणि टोंगाट यांच्या बरोबर चर्चा करेल. त्यांनी सांगितले की, आम्ही सकारात्मक आहोत. की आम्हाला सहमती आणि मूल्य निर्धारणावर एक न्याय्य योग्य समाधान मिळेल. गेल्या वर्षी, शेतकर्यांनी साखर नियंत्रण उत्पादन अधिनियमाला संपवण्यासाठी संसदेत याचिका दाखल केली होती. लोवेल्ड मध्ये स्थानिक शेतकर्यांचे प्रतिनिधीत्व करणार्या आठ संघांकडून हस्ताक्षरित केलेल्या याचिकेमध्ये ऊस उत्पादक टोंगाट कडून एकाधिक़ाराने संपूर्ण मूल्य साखळीमध्ये सुधारणेची मागणी करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.