तामिळनाडू ऊसाचा दर प्रती टन ४००० रुपये करण्याची मागणी

तंजावूर : थकीत पैशांच्या मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अरिनगर अन्ना साखर कारखाना, कुरुंगुलमसमोर धरणे आंदोलन केले. साखर कारखान्याने २०२०-२१ या गळीत हंगामातील ऊसाचे थकीत १८ कोटी रुपये त्वरीत देण्याची मागणी ऊस उत्पादक संघाचे अध्यक्ष पी. रामासामी यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी केली.

द हिंदू डॉट कॉमवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, त्यांनी राज्य सरकारकडे डीएमकेने निवडणुकीतील घोषणापत्रात जाहीर केलेल्या आश्वासनानुसार उसाचा दर ४,००० रुपये प्रती टन करण्याची मागणी केली. आगमी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत घोषणा करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी कावेरी जल प्रबंधन प्राधिकरणाकडे कर्नाटक सरकारकडून कावेरी नदीवर धरण बांधून पाणी अडविण्याच्या प्रकारात हस्तक्षेपाची मागणी केली. राज्य सरकारने साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात घटत असलेल्या भूजल स्तरामध्ये सुधारणेसाठी पावले उचलण्याची आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून घेतलेल्या पीक कर्जाला शंभर टक्के माफी द्यावी अशी मागणी केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here