ऊस दर ४५० रुपये क्विंटल करण्याची मागणी

अमरोहा : भारतीय किसान युनियन लोकशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन प्रश्नांची सोडवणूक करण्याची मागणी केली.

भाकियू लोकशक्तीचे जिल्हाध्यक्ष हसीन अहमद गफ्फारी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घ्यावेत, एमएसपीच्या हमीभावाचा कायदा करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, ऊसाचा दर ४५० रुपये प्रति क्विंटल जाहीर करावा, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराला आळा घालावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. हुकूमसिंह चौहान, राजपालसिंह चौहान, महेंद्र सिंह, रामगोपाल आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here