चांदपूर : भारतीय किसान युनियन लोकशक्ती गटाच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पंचायतीचे आयोजन करुन समस्या सोडविण्याबाबत तहसीलदारांना निवेदन दिले. उसाच्या दर ५०० रुपये प्रती क्विंटल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत कार्यकर्ते चार ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करतील असे जाहीर करण्यात आले.
भारतीय किसान युनियनचे कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयात पोहोचले. कार्यालय परिसरात त्यांनी विभागाचे अध्यक्ष चौधरी योगेंद्र सिंह काकरान यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुका अध्यक्ष मंगल सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित पंचायतीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. त्याबाबत चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याबाबत तहसीलदार सुनील कुमार यांना निवेदन दिले. उसाचा दर ५०० रुपये प्रती क्विंटल करण्यात यावा शेतकऱ्यांची सर्व कर्जे माफ करावीत, एमएसपीबाबत कायदा करावा, साठ वर्षांवरील शेतकऱ्यांना आणि कामगारांना मासिक दहा हजार रुपये निवृत्तीवेतन द्यावे, मोकाट जनावरांसाठी गोशाळा सुरू करावी, पंतप्रधान किसान योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या.
बैठकीत शेतकऱ्यांच्या समस्या लवकरात लवकर न सोडवल्यास चार ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन सुरू केले जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला नितीन कुमार, सत्यवीर सिंह, कामेंद्र सिंह, योगेंद्र सिंह, दिनेश पाल सिंह, काले कुमार शर्मा, ओमकार सिंह, दयाराम सिंह आदी उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link