ऊस दर पाचशे रुपये क्विंटल करण्याची मागणी

बिजनौर : भारतीय किसान युनियनच्या भानू गटाच्या मासिक पंचायतीमध्ये ऊसाचा दर प्रती क्विंटल पाचशे रुपये करण्याची मागणी करण्यात आली. स्थानिक समस्या सोडविण्याचा आग्रह वक्त्यांनी केला. शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन प्रभारी निरीक्षक जयकुमार यांना दिले.

गुरुवारी विभागात झालेल्या बैठकीत भाकियू भानू गटाच्या कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचे वक्त्यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत उसाचे पैसे मिळालेले नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस दर पाचशे रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी करण्यात आली. कोरोना काळातील विजेचे बिल माफ करण्याचा आग्रह करण्यात आला. याशिवाय स्थानिक समस्या सोडवाव्यात, साठ वर्षावरील शेतकऱ्यांना दरमहा पाचशे रुपये निवृत्तीवेतन द्यावे, तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत अशा मागण्या करण्यात आल्या.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेश प्रधान बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा महासचिव रवि कुमार यांनी संचालन केले. यावेळी गजेंद्र सिंह, राजेंद्र सिंह, अनिल कुमार, सोनू, हरी राज सिंह, नरेश सिंह, शकूर अहमद, समरपाल सिंह, धूम सिंह, हबीबुल्ला, अनिल कुमार, लोकेंद्र सिंह, ब्रहम पाल सिंह, अनिकेत, सत्येंद्र कुमार, देवेंद्र आदींसह भाकियू्च्या भानू गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here