नवी दिल्ली : सरकारने साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) वाढविण्याची गरज आहे असे इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने म्हटले आहे.
द हिंदू डॉट कॉममध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, असोसिएशनचे महासंचालक अविनाश वर्मा म्हणाले, आगामी २०२१-२२ या हंगामासाठी उसाचा लाभदायक आणि योग्य दरात (एफआरपी) वाढ केल्यानंतर सरकारने साखरेच्या विक्री दरातही वाढ करण्याची गरज आहे.
साखरेची एमएसपी गेल्या ३० महिन्यांपासून अधिक काळापासून स्थिर आहे. मात्र, २०२०-२१ या हंगामात उसाची एफआरपी १० रुपये प्रती क्विटंल वाढविण्यात आली. सध्या एमएसपी २१ रुपये प्रती किलो आहे. सरकारने एमएसपी ३४.५० रुपये ते ३५ रुपये करण्याची ही योग्य वेळ आहे असे इस्माचे म्हणणे आहे. उसाच्या एफआरपीमध्ये झालेली वाढ आणि साखर उत्पादन खर्च या दोन्ही बाबींसाठी पुरेसे ठरेल असे वर्मा यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link