एकरकमी ऊस दर देण्याची सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी केंद्र सरकारने निश्चित केलेली एफआरपी एकरकमी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही तशीच मागणी केली आहे. सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकरी एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप दराची घोषणा केली आहे. मात्र कारखान्यांनी ऊस तोडणी आणि वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची हवा सोडून ही वाहतूक बंद पाडण्याचे आंदोलन सुरू केले आहे.

याबाबत टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी एकरकमी ऊस बिले देण्याची घोषणा केली आहे. मात्र, इतर जिल्ह्यांत कारखान्यांनी असा निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत एकरकमी ऊस बिले देण्याची घोषणा होत नाही, तोपर्यंत साखर कारखान्यांना ऊस पाठवू नका असे आवाहन आम्ही शेतकऱ्यांना केले आहे.
त्यांनी सांगितले की, जर विरोध होत राहिला तर आमचे आंदोलन सुरू होईल. आम्ही साखर कारखाने प्रतिनिधींची बैठक आयोजित केली आहे. त्यामध्ये आम्ही त्यांना एकरकमी ऊस दर देण्यास तयार करणार आहे. बुधवारी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बैठक झाली. मात्र त्यातून तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी साखर कारखान्याला ऊस दर जाहीर न केल्याबद्दल साखर कारखान्यांच्या दारात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here