विजयनगरम : विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारकडे भीमासिंगी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकऱ्यांनी केलेल्या या मागणीला विविध पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कारखान्यात याप्रश्नी एक सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी उपस्थित असलेल्याने नेत्यांनी या युनिटचे आधुनिकीकरण केले जावे अशीही मागणी केली.
सीपीआयच्या राज्य समितीचे सदस्य एम. कामेश्वर राव यांनी सांगितले की, सरकारच्या धोरणामुळे हा कारखाना बंद पडला आहे. साखर कारखान्याच्या आधुनिकीकरणासाठी सरकारने निधी देण्याची मागणी त्यांनी केली. लोकसत्ता पक्षाचे राज्य कार्यकारी अध्यक्ष भीसेटी बबजी यांनी सांगितले की, दिवंगत मुख्यमंत्री वाय एस राजशेखर रेड्डी यांनी साखर कारखान्याला खूप पाठबळ दिले होते. मात्र, त्यानंतर विविध कारणांनी कारखान्याची स्थिती खराब झाली. विभागातील शेतकरी कारखाना सुरू होण्याची वाट पाहात असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला टीडीपी, जनसेना, सीपीएमच्या नेत्यांनी सहभाग घेतला. त्यानंतर त्यांनी युनिटचे कार्यकारी संचालक व्हिक्टर राजू यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन देण्यात आले. कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link