साखरेचे विक्री मूल्य 36 रुपये प्रति किलो करण्याची मागणी

करवीर तहसिल च्या कुडित्रे गावामध्ये असणार्‍या कुंभीकासारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले की, गेल्या दोन हंगामापासून साखर उद्योग मोठ्या आर्थिक संकटात अडकला आहे. साखरेच्या वापरात घट झाल्यामुळे कारखाने आपले कर्ज भागवू शकत नाहीत. त्यामुळे बँकांमध्ये कारखान्यांना उगाचच व्याज भरत बसावे लागत आहे. कारखानदारांबरोबर ऊस उत्पादक, साखर कामगार, ट्रान्सपोर्टर आणि व्यापारी देखील अडचणीत आहेत. साखर उद्योग वाचवण्यासाठी केंद्र सरकारला साखरेचे विक्री मूल्य वाढवून 36 रुपये प्रति किलो केले पाहिजे. जर सरकारने हे पाउल उचलले, तर देशातील साखर उद्योग आर्थिक संकटातून बाहेर येवू शकेल.
2019-2020 च्या गाळप हंगामापूर्वी 11 साखरेची पोती पूजेवेळी नरके बोलत होते. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उत्तम वरुटे आणि कार्यकारी निदेशक अशोक पाटील उपस्थित होते. नरके म्हणाले, घटत्या साखरेच्या दरामुळे आणि साखरेचा वापर कमी झाल्यामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देतेवेळी दबावाचा सामना करावा लागत आहे. साखर कारखान्यांना वर्तमानात 600 ते 700 रुपये प्रति टनाचे नुकसान झेलावे लागत आहे. म्हणूनच त्यांनी केंद्र सरकार ला लवरात लवकर साखरेचे विक्रीमूल्य वाढवण्याची मागणी केली आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here