साखर कारखाने लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी

अमरोहा, उत्तर प्रदेश: भाकियू च्या पदाधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या ऊसाच्या विविध समस्यांबाबत जिल्हा ऊस अधिकारी हेमेंद्र प्रताप सिंह यांना निवेदन दिले. दरम्यान, भाकियू जिल्हाध्यक्ष चौधरी महावीर सिंह यांनी आरोप केला की, नवीन जातीच्या ऊसाचे पीक पूर्णपणे तयार आहे, पण साखर कारखाने अजूनही सुरु झालेले नाहीत. त्यांनी साखर कारखाने लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली. त्यांनी ऊस थकबाकी आज म्हणजेच 15 ऑक्टोबरपर्यंत भागवणे, ऊसाला 450 रुपये प्रति क्विंटल दर घोषित करण्याची मागणी केली आहे. यावेळी ओमप्रकाश, जयदेव सिंह, सौरन सिंह, जगवीर सिंह आदींनी मनोगत व्यक्त केले.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here